Top GK Quiz Answer Description
महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ...
जानेवारी २६ १९५० भारतीय संविधान अमलात आल्यापासून इ.स.२०१२ सालापर्यंत यात एकूण ९६ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती. ...
भारतीय नियोजन आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे आहे. ...
आग्नेय आशियात १९४२ च्या सुमारास युद्धास प्रारंभ होऊन १५ फेब्रुवारी रोजी जपानने सिंगापूरचा ब्रिटिश आरमारी तळ काबीज केला. नेताजी सुभाषचंद्र सिंगापूरला पोहचण्यापूर्वी मलायी मोहिमेत जपान्यांच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश सेनेतील भारतीय सैन्याधिकारी कॅप्टन मोहनसिंग ह्यांनी जपान्यांच्या आश्रयाखाली भारतीय राष्ट्र सेना स्थापन केली. होती. त्याच वेळी स्वातंत्र्य चळवळीची कार्यवाही त्वरित व्हावी, म्हणून भारतीय स्वातंत्र्य-संघ स्थापून एक कृतिमंडळही नेमले होते. त्यावर ⇨राशबिहारी बोस ...
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी (रोमन लिपी: Dadabhai Naoroji ;) (४ सप्टेंबर, इ.स. १८२५ - ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनाकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ...
नोकिया कॉर्पोरेशन ही फिनलंडमधील मोबाईल फोन-निर्मिती करणारी, बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनी आहे. स्मार्टफोन हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. ...
इ.स. १९०५ साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची पुण्यात स्थापना केली. याची एक शाखा अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार या गांवी होती. ...
विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे) (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली ...
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. ...
. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडचेवर जवळून गोळ्या झाडल्या. सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. ...
गोल्फ : चेंडू व काठी या साधनांनी १८ खळग्यांचा मार्ग व्यापणाऱ्या मोठ्या मैदानावर खेळावयाचा एक विदेशी खेळ. गोल्फचा रबरी चेंडू कागदी लिंबाएवढ्या आकाराचा असतो. गोल्फच्या काठ्या ३ ते ४ फूट (सु. १ मी.) लांबीच्या असून त्या १४ प्रकारच्या असतात ...
रवींद्रनाथ ठाकूर ( (मे ७, इ.स. १८६१ - ऑगस्ट ७, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते. ...
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. ...
र्लिनची भिंत ही बर्लिन ह्या शहराचे विभाजन करण्यासाठी उभारण्यात आलेली एक काँक्रिटची भिंत होती. दुसर्या महायुद्धानंतर पराभूत नाझी जर्मनीचे पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी ह्या दोन स्वतंत्र राष्टांमध्ये दुभाजन करण्यात आले. ह्या दुभाजनादरम्यान नाझी जर्मनीची राजधानी बर्लिनचे देखील पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन असे दोन भाग करण्यात आले. ...
भारताचे संविधान किंव हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली ...
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जानेवारी ६, इ.स. १८१२; पोंभुर्ले, महाराष्ट्र - मे १८, इ.स. १८४६) हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी सुरू केले. ...
वृत्तपत्रकार गांधी : गांधींनी आपल्या राजकीय विचारसरणीचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याकरिता ७ एप्रिल १९१९ पासून सत्याग्रही ह्या संपादकीय नावाखाली सत्याग्रह नावाचे साप्ताहिक सरकारी परवान्याशिवाय प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ...
२१ ऑक्टोबर १९४३ ला नेताजींनी आझाद हिंदचे तात्पुरते सरकार प्रस्थापित केल्याची घोषणा केला. जपान, इटली, जर्मनी वगैरे राष्ट्रांनी तत्काळ त्यास औपचारिक मान्यताही दिली. लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारने नागरी शासनव्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले आणि काही मुलकी खाती उघडली. ...
जाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे ...
दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग) (९ मे, १८१४ - १७ ऑक्टोबर, १८८२) हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा आणि परमहंससभा ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. ...
संत गाडगेबाबा, एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत. ...
२०१४ हॉकी विश्वचषक ही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची दहावी आवृत्ती ३१ मे ते १५ जून, इ.स. २०१४ दरम्यान नेदरलँड्स देशामधील द हेग शहरात खेळवली गेली. ...
महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी - गुरुकुंज आश्रम याच तालुक्यात आहे. तिवसा हे गाव अमरावती-नागपूर महामार्गावर अमरावती पासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. ...
उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही ...
दयानंद सरस्वती : (? १८२४–३० ऑक्टोबर १८८३). आधुनिक वेदमहर्षी, निर्भय धर्मसुधारक, महापंडित, कुशल संघटक व आर्यसमाजाचे संस्थापक. काठेवाडमधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी दयानंदांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी तिवारी असे होते. ...
क्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) - या लढाईत मीर कासिम , अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला. ...
तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. ...
गा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड या राज्यात हिमालय पर्वतात होतो ...
Sort by Categories
Managed Services By: www.upscgk.com