Top GK Quiz Answer Description
भारतात स्वातंत्र्याची चळवळ 1942 नंतर जोरदारपणे सुरू होती. त्यामुळे देश सोडून जाण्यासाठी ब्रिटिश सत्तेवर दबाव वाढत होता; तर दुसरीकडे स्वतंत्र पाकिस्तानची मागणीही जोर धरू लागली होती. फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांनी भारताला उशिरात उशिरा म्हणजे जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य देण्यात येईल असे जाहीर केले; पण त्या अशांत परिस्थितीत ठरलेल्या मुदतीआधीच भारताला स्वातंत्र्य देण्याची योजना प्रत्यक्षात आली. ...
काँग्रेसच्या दबावाखाली हिंदुस्थानात प्रातिनिधिक संस्थांची हळूहळू वाढ होत होती. ह्या संस्था वाढत्या प्रमाणात सत्तेत सहभागी होणार हे स्पष्ट होते. अशा प्रातिनिधिक संस्थांत अल्पसंख्य जमातीच्या हिताकडे दुर्लक्ष होईल, अशी भीती काही मुसलमान नेत्यांना वाटत होती. त्याचबरोबर काँग्रेसच्या वाढत्या बळामुळे, विशेषतः त्यातील जहाल मतवादी नेतृत्वामुळे, ब्रिटीश राज्यकर्ते अस्वस्थ होऊ लागले होते. त्यामुळे जेव्हा काही मुसलमान नेत्यांनी मुस्लीम लीगची स्थापना (ढाका ) केली ...
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. ...
सातवी घटनादुरुस्ती (इ.स. १९५६) – भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यपुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी इ.स. १९५६ मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली. इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याबरोबरच ही घटनादुरुस्तीही संमत केली गेली. ...
अहमदाबाद येथे ‘गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी’ मार्फत वर्तमान हे साप्ताहिक १८४९ मध्ये चालू झाले. त्यात अहमदाबादचे तत्कालीन अतिरिक्त न्यायाधीश सर अलेक्झांडर किन्लॉक फोर्बस यांनी तुरुंगव्यवस्थेवर टीका करणारा लेख लिहिला, त्यामुळे मुंबई सरकारने त्यांची बदली केली. पुढे या पत्राला उतरती कळा लागून १८५४ साली ते बंद पडले.अहमदाबाद येथे ‘गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी’ मार्फत वर्तमान हे साप्ताहिक १८४९ मध्ये चालू झाले. ...
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो ...
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. ...
गांधीवादी विचारसरणीच्या इला भट या उच्च न्यायालयातील रमेश भट या न्यायाधिशांच्या सुविद्य ( वकील ) कन्या असून त्या महात्मा गांधीनी स्थापन केलेल्या ‘ टेक्सटाइल लेबर असोसिएशन ’ ...
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ...
रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती ...
बादशाह पंचम जॉर्ज याच्या राज्यारोहणानिमित्त दिल्ली येथे १९११ साली दरबार भरविण्यात आला. त्या प्रसंगी बंगालची फाळणी रद्द केल्याचे आणि भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला स्थलांतरित केल्याचे जाहीर करण्यात आले ...
शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. ...
आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ...
रामकृष्ण मिशन : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापना झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील एक सेवाभावी संस्था. संस्थापक स्वामी विवेकानंद. मूळ प्रेरणा त्यांचे सद्गुरू ⇨ रामकृष्ण परमहंस यांची. आयुष्याच्या अखेरीस काशीपूरच्या उद्यानगृहात कर्करोगाने आजारी असताना जानेवारी ते ऑगस्ट १८८६ या अवधीत आपल्या आठ-दहा तरुण शिष्यांना व विशेषेकरून विवेकानंदांना म्हणजे त्यावेळच्या नरेंद्राला रामकृष्णांनी जे मार्गदर्शन वेळोवेळच्या संवादांतून केले ...
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात जुलै २० इ.स. १८२८ रोजी झाला. सर्व भावंडात ते धाकटे होते. त्यांचे बालपण सातारा या शहरी गेले. प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न हेही सातारी येथेच झाले. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते सातारा येथे होते. ...
Sort by Categories
Managed Services By: www.upscgk.com